हा प्रवास सुंदर आहे……
मराठवाड्याच्या ध्वजस्तंभास ‘अभंग’ची मानवंदना! (१) हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा लेखक - अनंत भालेराव या ग्रंथाची पाचवी आवृत्ती. हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संग्राम झाला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तरी हैदराबाद संस्थानात समाविष्ट असलेल्या भागाच्या स्वातंत्र्यासाठी त्यानंतर तब्बल १३ महिने संघर्ष करावा लागला होता. सन १९४८ साली सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पोलिस कारवाई सुरू झाली आणि १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद संस्थान निजामी राजवटीतून मुक्त झाले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावरच भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पुर्णत्व मिळाले. या ऐतिहासिक स्वातंत्र्याचे 'अमृतमहोत्सवी वर्ष' 17 सप्टेंबर रोजी संपत आहे. या निमित्ताने अनंत भालेराव लिखित वरील ग्रंथाची पाचवी आवृत्ती जुन्या व नव्या पिढीतील वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे. तत्कालीन हैदराबाद संस्थानात तेलंगणा आणि कर्नाटकच्या भागासह मराठवाडा विभागाचा समावेश होता. निजामी राजवटीविरुद्धच्या निकराच्या लढाईत मराठवाड्याने लक्षणीय योगदान दिले. त्याग, बलिदान आणि हालअपेष्टा सोसण्य